मीण भागात मानसोपचार तज्ञ म्हणून प्रॅक्टिस करताना असे वाटू लागले की, येथे मानसिक आजारावर उपचार तर महत्वाचे आहेतच; पण सोबत हे रुग्णमित्र जेव्हा त्यांच्या आयुष्यात पुन्हा जाण्यासाठी निघतील, तेव्हा त्यांना योग्य प्रकारे समाजात वावरता यायला हवे, त्यांना योग्य प्रकारे काम करता यायला हवे. शिवाय समाजात कसे वागावे कसे राहावे ,कुटुंब आणि स्वत:ची काळजी कशी घ्यावी, व्यसनांपासून लांब कसे राहावे? या प्रकारचे अनेक प्रश्न मनामध्ये येत असत.
असेही काही अनुभव आले की, मानसिक आजाराचा रुग्ण म्हणजे त्याला नोकरी नाही, लग्नाला अडचण, समाजात मानाने रहाणे कठीण! ओपीडीत कोणी रुग्ण मित्राने प्रश्न उभे केले तर आणखीनच वाटायचं. मग बऱ्याच लोकांशी, घरातल्या व्यक्तींशी चर्चा केली आणि मग आपणच अशा व्यक्तींसाठी पुनर्वसन केंद्र सुरू करावे, असे वाटले मग सुरू झाली शोधाशोध. मी जरी मानसोपचार तज्ञ असलो तरी पुनर्वसन हे टीमवर्क आहे यासाठी समुपदेशक, सोशल वर्कर, इतर डॉक्टर्स, नर्स, केअर टेकर, सेक्युरिटी इत्यादी वेगवेगळ्या प्रकारची पण समविचारी लोक एकत्र येऊनच पुनर्वसनाची प्रक्रिया पार पडते आणि मग होते रिकव्हरी….
सुमन हे माझ्या आजीचे नाव. सर्वांना जसे आपल्या आजी-आजोबांचं घर वाटावं असा जिव्हाळा, प्रेम मिळाला की, हे केंद्र एक घरच वाटावं, जिथे मला मानसन्मान मिळतो, अनुभवातून बऱ्याच समाज उपयोगी गोष्टी शिकायला मिळतात, ज्या घरात मी मनमोकळे पणे वावरतो, जिथे मी प्रसन्न आणि चिंतामुक्त असतो. म्हणजेच घरासारखंच वातावरण, शास्त्रीय गोष्टी, अनुभवी आणि योग्य माणसे त्यांचे समुपदेशन, विविध उपचार पद्धती, मानसोपचार सर्वांचा वापर झाला म्हणजेच पुनर्वसन होय.
सुमन म्हणजे चांगले, सुदृढ, निरोगी मन होय. मनाला टवटवीत करण्यासाठी, व्यसनांपासून दूर नेण्यासाठी मानसोपचारांसह पुनर्वसनातून रिकव्हरीकडे रुग्णमित्राला घेऊन जायचं, या हेतूने म्हणून केंद्राला आम्ही “सुमन पुनर्वसन व व्यसनमुक्ती केंद्र’ असे नाव दिले.
मानसिक आजार किंवा व्यसन, हाही एक मानसिक आजारचं आहे. रुग्णमित्र जेव्हा केंद्रात दाखल होतात ते अगदी डिस्चार्ज होईपर्यंत त्यांचे वेळापत्रक ठरलेलं असते. सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत विविध गोष्टी केंद्रात चालू असतात. त्यात समुपदेशन, वैयक्तिक मार्गदर्शन, वेगवेगळया थेरपीज, मैदानी खेळ, बैठे खेळ, संभाषण कौशल्याच्या ऍक्टिव्हिटी, योगासने, रिलॅक्सेशन पध्दती, व्यायाम, पोषक आहार, कला, नृत्य, मार्गदर्शक प्रवचने, अल्कोहोलीक ऍनोनीमसच्या मिटींग्ज अशा प्रकारच्या 100 हुन अधिक ऍक्टिव्हिटी केंद्रात चालू असतात. क्षमतेनुसार त्यात समुपदेशक, सोशल वर्कर असे आम्ही सर्वजण मिळून त्यात बदलही करतो .
पुण्यात जिथे मी प्रॅक्टिस करतो तिथे बरीच केंद्रं आहेत, पण ग्रामीण भागात याविषयी एवढी जनजागृती नाही. जिथे अजूनही लोकांना वाटते की, सलाईन लावलं की माणूस बरा होतो. सुमन पुनर्वसन आणि व्यसनमुक्तीच्या साह्याने आम्ही सर्व जण रुग्ण खऱ्या अर्थाने कार्यान्वित होण्यासाठी त्याची औषधे ही कमीत कमी किंवा बंद झाली पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. या सगळ्या प्रक्रियेत केंद्र, रुग्णाचे नातेवाईक, स्वतः रुग्ण या सर्वांनी मिळून प्रयत्न केला तरच रिकव्हरी ही जलद आणि हवी तशी होत असते.
व्यसन लागलेल्या माणसालाही या सर्व गोष्टींची साथ हवी असते. योग्य तो रस्ता दाखवायचे काम आपण करतो. व्यसनाचा रस्ता बदलला की, त्याचं डेस्टिनेशन पण बदलतं. केंद्रात रुग्ण डिस्चार्ज झाल्यानंतर त्याचे आठवड्याला फॉलो-अप घेतला जातो त्यात त्याला/तिला काही अडचणी आहेत का, काही प्रसंग त्याच्या समोर आलेत का, तो परत व्यसनाकडे वळत आहे का, सामाजिक, वैयक्तिक, कामाच्या ठिकाणी काही अडचणी येतात का या सर्व गोष्टींची माहिती घेतली जाते.
स्वतः समुपदेशक, मानसोपचार तज्ञ त्या व्यक्तीशी आणि त्याच्या नातेवाईकांशी संपर्कात असतात व अडचणींवर मार्गदर्शन, औषधांमध्ये बदल करतात; जेणेकरून पुन्हा ती व्यक्ती व्यसनाच्या जाळ्यात अडकू नये.
अल्कोहोलीक ऍनोनीमस नावाच्या जगप्रसिद्ध संघटनेच्या आठवडा मीटिंगला येऊन ते स्वतःचे अनुभव शेअर करतात. तसेच आम्ही या मिटींग्जसोबत रुग्णाचे नातेवाईक यात त्याची पत्नी, मुले, त्याचे पालक यांनाही व्यसनाविषयी त्याच्या दुष्परिणाम विषयी मार्गदर्शक सत्रे, शिबिर घेत असतो. त्यांनी या परिस्थितीत रुग्णांशी कसे वागावे, कसा संवाद साधावा स्वतःला कसे खंबीर बनवावे, या बाबी त्यांना शिकवल्या जातात. म्हणजेच रुग्णाला रुग्ण म्हणून न पाहता त्याला एक व्यक्ती म्हणून त्याच्या अडचणींवर कशी मात करायची, मदत करायची या सर्व बाबी शिकवल्या जातात.
केंद्रात दाखल होईपर्यंतचे तुम्ही पैसे भरले म्हणजे सर्व संपले असे न करता, डिस्चार्जनंतरही उपचार चालू असतात. बऱ्याचदा रुग्ण पुन्हा व्यसनाकडे वळण्याची शक्यता असते. अशा प्रसंगी “रिलॅप्स प्रिव्हेन्शन’चा कार्यक्रम राबवला जातो. यातूनच रिकव्हर झालेले लोक, डिस्चार्ज झाल्यानंतर, केंद्रात वेगवेगळ्या जबाबदरीची कामेही करतात, कोणी साफसफाई, कोणी गार्डनमध्ये, कोणी गायींची काळजी घेणे, टायपिंग करणे, अशा प्रकारची कामे आपल्या क्षमतेनुसार करत असतात, त्याचा त्यांना वेतनही मिळते.
म्हणजेच गंभीर मानसिक आजार व व्यसनमुक्ती दोन्हींवर मात करून कमीत कमी खर्चात, कमीत कमी औषधाचा वापर करून रुग्ण हे सु-मनाचे बनवणे हेच सुमन पुनर्वसन व व्यसनमुक्ती केंद्राचे उद्दिष्ट होय.
लवकरच 200 खाटांचे अद्ययावत सर्व सोयींनी युक्त महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या केंद्रापैकी एक असे सुमन पुनर्वसन व व्यसनमुक्ती केंद्र सुरू होणार आहे. तसेच त्वचा, केसांच्या सर्व समस्या, इसब, नायटे, कोड, सोरायसिस, नखांच्या समस्या, आजार यावर खात्रीशीर, योग्य आणि अल्प दरात सर्व उपचार कुलस्वामी मेडिकल फाउंडेशनच्या अनंतराव कणसे वैद्यकीय महाविद्यालयात सुरू केल्या आहेत. सुंदर मन व निरोगी त्वचा हेच यावर्षीचे आमचे ब्रीदवाक्य होय.
संकलन: संजोग काळदंते
ओतूर, ता. जुन्नर