आहारातील कोणतेही गोड पदार्थ करताना आपण त्यात साखरेचा वापर करतो. काही पदार्थात आपण गुळाचाही वापर करतो. ऊसापासून तयार केले जाणारे गूळ आणि साखर, हे पदार्थ मोठया प्रमाणावर खाल्ले जातात. आहारात प्राचीन काळापासून गुळाचा वापर केला जातो.
लाडू, पुरणपोळी, असे विविध पदार्थ गुळापासून बनवले जातात. आपल्याकडे एक जुनी प्रथा होती, की कोणी घरात आले की वाटीत गुळाचा खडा आणि पाणी द्यायचं. शरीराला लवकर ऊर्जा मिळावी, हा या मागचा उद्देश. आता आहारातील गुळाची जागा हळूहळू साखरेनं घेतली. त्यामुळे शरीराला गुळापासून मिळणारी पोषणतत्त्व गायब झाली. आणि साखरचे दुष्परिणाम शरीरात वाढले. साखर विषासारखे काम करते. स्लो-पॉईझनिंग त्यास म्हणता येईल. साखर अनेक आजारांचे कारण ठरते.
1.गूळ खाल्याने पचनक्रिया सुधारते.
2.जर वजन कमी करायचं असेल तर साखरेच्या चहाचं सेवन न करता गुळाच्या चहाचं सेवन करू शकता.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
3.गुळामध्ये कॅल्शिअम आणि लोह जास्त प्रमाणात असल्याने शरीरात साखरेचे प्रमाण संतुलित राहते.
4.मासिकपाळी दरम्यान पोटदुखी होत असल्यास गूळ खाल्ल्याने त्रास कमी होतो.
5.सांधेदुखीचा त्रास असेल तर 1 ग्लास दुधासोबत गूळ घेतल्यानं हाडं मजबूत होतात.
6.आल्यासोबत गुळाचे सेवन केल्याने देखील सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
7.गूळ शरीरातील हानिकारक टॉक्सिन बाहेर काढण्यास मदत करतो.
8.शरीरात हिमोग्लोबीन कमतरता असल्यास गूळ खाऊन ती दूर केली जाऊ शकते. गूळ, शेंगदाणे खाल्ल्याने हिमोग्लोबीन लवकर वाढते. त्यामुळे साखरपेक्षा गुळाला पसंती द्यायला हवी.