Success Story : प्रत्येक मुलीचे स्वप्न असते चांगले शिक्षण घेऊन समाजात आपली वेगळी ओळख निर्मण करावी. पण काही मोजणक्यच मुलींचे स्वप्न सत्यात उतरते. तर काहीं जणी आपले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अपार मेहनत करतात. आज अशाच एका ध्येयवेड्या महिलेची कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जिने लग्नानंतर आपल्या सर्व जबाबदाऱ्या योग्यरित्या पाळून उपजिल्हाधिकारी पदावर विराजमान होण्याचा मान मिळवला आहे. ही गोष्ट आहे उपजिल्हाधिकारी सिम्मी यादव यांची.. चला तर या मग जाणून घेऊया सिम्मी यादव यांचा प्रेरणादायी प्रवास…
लग्नानंतर अभ्यास करता येत नाही, असे अनेकदा तुम्ही महिलांकडून ऐकले असेल आणि काही प्रमाणात खरं आहे. लग्नानंतर घर सांभाळून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं तस पाहिलं तर तारेवरची कसरतच आहे. पण असे असले तरी अशी अनेक कुटुंबे आहेत जी आपल्या घरातील महिलांना पूर्ण पाठिंबा देऊन त्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी मदत करतात. असाच आधार अन् पाठिंबा मिळाला तो म्हणजे उपजिल्हाधिकारी सिम्मी यादव यांना..
मध्य प्रदेश राज्य सेवा परीक्षा 2019 मध्ये यश संपादन केलेल्या इंदूरच्या सिम्मी यादवने लग्नानंतर परीक्षेची तयारी सुरू केली होती. सिम्मीने आपल्या आज पर्यंतच्या प्रवासाची माहिती देताना एका मुलाखतीत,” लग्नाच्या एक वर्षानंतरच आपण सिविल परीक्षेसाठी तयारी करत होतो असे म्हटले होते. मात्र नवीन लग्न झाल्यानंतर त्या घरात रुळण्यासाठी जो वेळ लागतो त्याच काळात मी माझा अभ्यास सुरु केला होता. यावेळी काही कौटुंबिक अडचणी आल्या मात्र माझ्या पाठीशी माझे पती खंबीरपणे उभे राहिले. त्याच्या जोरावरच मी माझ्या अभ्यासावर संपूर्ण लक्ष केंद्रित करू शकले आणि दुसऱ्यांदा एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले. असे त्यांनी संगितले. दरम्यान, एमपीपीएससीची परीक्षा सलग दुसऱ्यांदा उत्तीर्ण झाल्यानंतर सिम्मी उपजिल्हा दंडाधिकारी झाल्या
सिम्मी यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये एमएससी पदवी घेतली आहे. सिम्मीचा पती राहुल यादव चेन्नई येथील एका आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. राहुल म्हणतो की, मला विश्वास आहे की सिम्मी तिच्या ध्येयात यशस्वी होईल.
नागरी सेवा परीक्षेतील यशाचे संपूर्ण श्रेय सिम्मी यांनी आपल्या पतीला दिले आहे. याविषयी बोलताना, “लग्नानंतर माझ्या पतीने नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्यास नकार दिला असता, तर मी त्यांचा सल्ला मान्य केला असता, कारण माझ्यासाठी कौटुंबिक मूल्यांपेक्षा आणि नातेसंबंध यापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही.”पण माझ्या पतीने असे काही न करता उलट मला या परीक्षेसाठी मला प्रेरणाच दिली त्यामुळे आपण आजचा दिवस पाहू शकतो असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, आपल्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी कशाचेही बंधन नसते हे सिम्मी यादव यांनी दाखवून दिले आहे. इच्छित ध्येय साध्य करायचे असेल तर त्यासाठी फक्त लागते ती जिद्द आणि आपल्या माणसांची साथ हे सिम्मी यादव यांच्याकडे पाहून लक्षात येते.