Sudhir Mungantiwar | छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानचा वध ज्या वाघनखांनी केला. तीच वाघनख भारताला परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती. त्यानुसार ही वाघनख ब्रिटनकडून ४ मे रोजी महाराष्ट्रात आणली जाणार होती. पण आता ही वाघनख आणण्यासाठी विलंब होत आहे. यावरून अनेकदा सवाल उठले गेले आहेत. त्यानंतर आता सुधीर मुनगंटीवार यांनी वाघनख भारतात आण्यासाठी विलंब का होत आहे? यामागचे कारण एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ‘वाघनखं येण्याबाबत आम्ही ४ मे तारीख निश्चित केली होती. त्यादृष्टीने सर्व पत्रव्यवहार झाला आणि ४ मे रोजी येण्याबाबत मंजुरी लिखित देण्यात आली. पण आचारसंहिता लागली तेव्हा त्यांनी आमच्याशी चर्चा केली. वाघनखआचारसंहितामध्ये आणण्यामध्ये आमच्याही अडचणी होत्या. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे काँग्रेस किंवा इतर पक्षांनी आक्षेप घेत तक्रारी केल्या असत्या. निवडणूका बघून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत भावनिक मतदारांना आव्हान केले जात आहे असा आरोप केला असता.’
पुढे त्यांनी सांगितले की, ‘आचारसंहिता संपल्यानंतर वाघनख भारतात आणण्यासाठी १० जून तारीख आम्ही निश्चित केली आहे. पण त्यांनी आम्हाला यासाठी तुमच्या निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता १० जूनच्या आधी संपेल, असे लिखित स्वरूपात पत्र हवे असल्याचे सांगितले. यासंदर्भात निवडणूक आयुक्तांसोबत चर्चा केली आहे. त्यानुसार पुढील प्रक्रियेसाठी आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. कारण त्यांच्या परवानगीचं पत्र हे लंडन म्यूजियमला द्यायचं आहे. परवानगी मिळाल्यास अपेकक्षा प्रमाणे कामपूर्ण होईल.’
“आचारसंहितेमध्ये वाघनखांबद्दल अडचण येऊ नये असे आम्हाला वाटते. त्यामुळे १० जूनपर्यंत वाघनखा येतील. वाघनखांसाठी काही जागा निश्चित केल्या आहेत. तसेच ही वाघनख सातारा, नागपूर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर येथील म्युझियममध्ये ठेवले जाणार आहे,” अशी माहितीही सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
हेही वाचा:
मायावतींनीही दिल्लीच्या सातही लोकसभा जागांवर उभे केले ‘उमेदवार’