मुंबई – बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांचा आज वाढदिवस आहे. ते सोमवारी त्यांचा 76 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 24 जानेवारी 1945 रोजी नागपुरात जन्मलेल्या सुभाई घई यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. एक काळ असा होता की सुभाष घईंसोबत काम करणं हे प्रत्येक फिल्मस्टारचं स्वप्न असायचं. सुभाष घई यांचे कालीचरण, विश्वनाथ, कर्ज, हीरो, मेरी जंग, कर्मा, राम लखन, सौदागर, खलनायक, परदेस आणि ताल हे प्रसिद्ध चित्रपट आहेत.
सुभाष घई यांना ‘बॉलिवुडचे शोमन’ म्हटले जायचे. त्यांनी रोहतकमधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII), पुणे येथून सिनेमाचे शिक्षण घेतले. सुभाष घई यांना चित्रपटसृष्टीत प्रवेश करणे सोपे नव्हते. सुरुवातीला त्याला खूप संघर्ष करावा लागला. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, सुरुवातीला जेव्हा ते मुंबईत आले तेव्हा त्यांना कोणत्याही स्टुडिओत प्रवेश दिला जात नव्हता कारण ते बाहेरुन आले होते.
सुभाष घई यांनी तकदीर आणि आराधना सारख्या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका करून अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, परंतु सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक बनणे त्यांच्या नशिबी होते. अभिनेता म्हणून नशीब चमकले नाही, त्यानंतर त्यांनी दिग्दर्शनाकडे वाटचाल केली आणि उत्कृष्ट चित्रपट करून स्वतःला बॉलिवूडचा दुसरा शो मॅन बनवला.
सुभाष घई यांनी त्यांच्या चित्रपटातून अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना संधी दिली आहे. ज्यामध्ये जॅकी श्रॉफ, रीना रॉय, मीनाक्षी, माधुरी दीक्षित, मनीषा कोईराला यांच्या नावाचा समावेश आहे. सुभाष घई यांच्यासाठी ‘म’ अक्षर खूप लकी ठरले, त्यामुळे 80 आणि 90 च्या दशकात त्यांच्या सर्व चित्रपटांच्या नायिकांची सुरुवात याच नावाने झाली. घई हे त्या काळातील असे दिग्दर्शक होते ज्यांनी माधुरी दीक्षितला ‘नो प्रेग्नेंसी’ क्लॉजवर सही करायला लावली.ज्या अंतर्गत चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान माधुरीसमोर लग्न न करण्याची किंवा गर्भवती नसण्याची अट ठेवण्यात आली होती. खरे तर संजय आणि माधुरीही त्या काळात रिलेशनशिपमध्ये होते, त्यामुळे घई यांनी हा बाँड साइन केला.