नारायणगांव – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्यातील छंद, कलागुण जोपासण्यासाठी या संमेलनात सहभागी व्हावे. तांत्रिक शिक्षण घेत असताना केवळ सैध्दांतिक ज्ञानावर अवलंबून न राहता प्रात्यक्षिक ज्ञान आत्मसात करण्यासाठी आणि कौशल्य विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील असायला हवे, असे विचार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व्यक्त केले. जयहिंद शैक्षणिक संकुलाच्या वार्षिक स्नेहसंमेलन स्पंदन 2020 व वार्षिक पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गुंजाळ होते. याप्रसंगी जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, संभाजी तांबे, सुनील बाणखेले, माउली खंडागळे, मंगेश काकडे, संचालिका शुभांगी गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डी. एस. गल्हे, प्राचार्य डॉ. डी. जे. गरकळ, प्राचार्य वाय. एस. गुंजाळ उपस्थित होते.
जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पॉलिटेक्निकचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. यावेळी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आणि विविध गुणदर्शन कार्यक्रमामध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना आढळराव पाटील यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हेमंत महाजन यांनी केले.