पुणे – यंदा परतीचा पाऊस चांगला झाल्याने जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील 25 धरणांपैकी 15 धरणांमध्ये 90 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. भामा-आसखेड-98 टक्के, वरसगाव-90 टक्के, पानशेत-92 टक्के, भाटघर-96 टक्के आणि उजनीमध्ये 100 टक्के पाणीसाठा आहे. यंदा धरणात समाधानकारक पाणी उपलब्ध असल्याने शेती आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही.
यंदा मान्सून चांगला बरसला. त्यामुळे ऑगस्टमध्ये जिल्ह्यातील धरणे भरली. त्यानंतरसुद्धा पावसाचा जोर कायम असल्याने धरणे काठोकाठ भरून सर्वच धरणांमधून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे वजा पाणीसाठा असलेले उजनी धरणही 100 टक्के भरले. त्यानंतर परतीचा पाऊसही जोरदार झाल्याने पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड या तालुक्यातील तलाव भरले. नद्यांना पूर आला.
धरण-पाणीसाठा
वडज – 95.41%
डिंभे – 95.58%
घोड – 91%
कळमोडी – 99.63%
चासकमान – 96.65%
भामा आसखेड – 98%
पवना – 83.17%
मुळशी – 64%
उजनी – 100%
गुंजवणी – 96%
निरा देवधर – 99.15%
नाझरे – 98%