पुणे (प्रतिनिधी) – सरकारी पदभरतीकरिता राज्य सरकारने नियुक्त केलेल्या महपरिक्षा या पोर्टलकडून घेतल्या जाणाऱ्या परिक्षांमध्ये सावळा गोंधळ सुरू आहे. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे हे पोर्टल बंद करुन, पुन्हा एमपीएससीमार्फत पदभरतीच्या परिक्षा घेण्याची मागणी एमपीएससी समन्वय समितीने केली आहे. त्याकरिता या विद्यार्थ्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून (दि.5) आमरण उपोषण सुरू केले आहे.
या पोर्टलकडून घेतल्या जाणाऱ्या परिक्षांमध्ये सावळा गोंधळ सुरु आहे. त्यामध्ये सामूहिक कॉपी होणे, अभ्यासक्रमानुसार परिक्षा न होणे, प्रश्नांची पुनरावृत्ती, मोबाइरलसारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर होणे, बैठक व्यवस्थेचा बोजवारा, वेळेवर परिक्षा न होणे, बायोमेट्रीक पद्धतीने हजेरी न घेणे डमी उमेदवार पकडल्यानंतर कोणतही कारवाई न करणे असे
गंभीर आरोप या विद्यार्थ्यांनी केले आहेत. त्यामुळे हे पोर्टल बंद करून पुन्हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने परीक्षा घेणे सुरु करावे अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.