Bajrang Dal – रांची येथील ‘शौर्य जागरण यात्रा कार्यक्रमा’मध्ये सहभागी होऊन हजारीबागला परतत असताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या बसवर जमावाने दगडफेक केल्याने बजरंग दलाचे (Bajrang Dal) किमान 10 कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
त्यात काहीं महिलांचाहीं समावेश आहे. रविवारी रात्री पावणे नऊ वाजता हजारीबागजवळील पेलावल परिसरातील मशिदीजवळ ही घटना घडली. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही,
परंतु या घटनेत सहभागी असलेल्या दोन्ही गटांच्या हल्लेखोरांची ओळख पटली आहे आणि संबंधित व्यक्तींवर एफआयआर दाखल केला जाईल असे पोलिसांनी सांगितले.
दगडफेक करणाऱ्या एका विशिष्ट समुदायाच्या सदस्यांनी बस मशिदींसमोर थांबवली, त्यावेळी त्यातील प्रवाशांनी ‘जय श्री राम’ आणि इतर धार्मिक आणि आक्षेपार्ह घोषणा दिल्याचा आरोप केला आहे.
पोलीस दल वेळेवर पोहोचल्याने मोठा अनुचित प्रकार घडू शकला नाही.नंतर पोलिसांनी या बसला सुरक्षा व्यवस्था पुरवून कटकमसांडी येथे पोहचवले. त्यावेळी काही हल्लेखोर या बसचा पाठलाग करीत होते असे सांगण्यात येते.
विश्व हिंदू परिषदेच्या युवा शाखा बजरंग दलाने रविवारी रांचीमध्ये चार ‘शौर्य जागरण यात्रा’ काढल्या. पुढील वर्षी जानेवारीत अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या नियोजित उद्घाटनासाठी लोकांना धार्मिक विधींसाठी आमंत्रित केले.
रातू रोडवरील पहाडी मंदिर, चुटिया येथील मांडा मैदान, बारगेतील पंचमुखी हनुमान मंदिर आणि रातू गड येथून काढण्यात आलेल्या या यात्रेत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
चार रथांसह काढण्यात आलेल्या यात्रेचा समारोप तारा मैदानावर झाला. तेथून हे कार्यकर्ते बसने परतत असताना हा प्रकार घडला.