मुंबई – शेअर निर्देशांक आज जवळजवळ एक टक्क्याने कोसळले. त्यामुळे शेअर बाजारावर नोंदलेल्या सर्व कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य आज एकाच दिवसात 4.86 लाख कोटी रुपयांनी कमी झाले. त्यामुळे आता भारतीय शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य 373 लाख कोटी रुपये इतके झाले आहे.
जागतिक अर्थव्यवस्था खराब होण्याची लक्षणे दिसून येत आहेत. जपानच्या रिझर्व्ह बँकेने व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे आता आशियाई देशातील अर्थव्यवस्था कमकुवत होण्याची शक्यता असल्यामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली, असे विश्लेषकांनी सांगितले.
बीएसईचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स 736.37 अंकांनी किंवा 1.01 टक्क्यांनी घसरून 72012.05 वर बंद झाला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी-50 देखील 238.25 अंकांच्या किंवा 1.08 टक्क्यांच्या घसरणीसह 21,817.45 च्या पातळीवर बंद झाला.