सुभाष कपूर यांनी व्यक्त केली इच्छा
नवी दिल्ली – राज्यघटनेचे कलम 370 हटवून जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा रद्द केल्यानंतर आता इतर राज्यातील रहिवाश्यांना तेथे जमीन खरेदी करण्याचा तसेच आपली कंपनी सुरू करण्याचा रस्ता मोकळा झाला आहे. त्यातच हेल्मेट बनवणाऱ्या स्टीलबर्ड हाइ टेक कंपनीने मंगळवारी जम्मू-काश्मीरमध्ये उत्पादन करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ही कंपनी आता काश्मीरमध्ये आपला प्लांट उभारणार असल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे.
कंपनीचे अध्यक्ष सुभाष कपूर यांनी सांगितले की, काश्मीरमध्ये एक नवीन औद्योगिक क्रांतीची शुरुवात होऊन तेथील रहिवाश्यांना रोजगाराची संधी मिळणार आहे. तसेच सरकारच्या या निर्णयाने काश्मीर देशाच्या विकासामध्ये सामील होण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आतापर्यत जम्मू आणि काश्मीरमध्ये उत्पादनाचा अधिकार तेथील नारिकांनाच होता. यामध्ये कृषी व हॅन्डीक्राफ्टचा सहभाग होता. स्टीलबर्ड कंपनीने याआधी हिमाचल प्रदेशात वृद्दीसाठी 150 कोटी गुंतवले होते. तसेच कंपनीची हेल्मेट उत्पादन क्षमता 44500 प्रतिदिन करण्याची योजना आहे. त्यामुळे आम्ही येथील तरुणांसाठी लवकरच काही करु असा मला विश्वास आहे असेही कपूर यावेळी म्हणाले.