मुंबई : आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे बजेट म्हणजे, अर्थसंकल्प सादर होत आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार वर्ष 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करत आहेत. या अर्थसंकल्पातून नेमकं कोणत्या क्षेत्राला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास आणि उद्योग या पाच सूत्रांनी झालेली प्रगती म्हणजेच विकास असतो. ही पंचसूत्रीच यंदाच्या अर्थसंकल्पाचा पंचप्राण आहे. त्यासाठी राज्यात विकासाची पंचसूत्री हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…