कोरेगाव भीमा – तुळापुर नागरिकांना येत असणाऱ्या विजेच्या विविध समस्यांचे निराकरण व तात्काळ निवारण करण्यासाठी प्रदीप वसंतराव कंद यांच्यामाध्यमातून महावितरण दरबाराचे आयोज करण्यात आले आहे .महाराष्ट्र राज्य विद्युत नियंत्रण वतीने नागरिकांच्या वीजेबाबत असलेल्या समस्या सोडवण्यासाठी भव्य महावितरण दरबाराचे आयोजन महाराष्ट्र राज्य विद्युत नियंत्रण कंपनी , पुणे जिल्हा समिती सदस्य प्रदीप वसंतराव कंद यांच्या वतीने करण्यात आले आहे.
लोणीकंद , केसनंद , बकोरी, आव्हाळवाडी, मांजरी गावांसाठी शनिवार दि . १२ मार्च २०२२ रोजी सकाळी १० ते दु .०३ वा . स्थळ : केसनंद , राधास्वामी मठा समोर येथे विज बिल दुरुस्ती अभियान (घरगुती, वाणीज्य, औद्योगिक, शेती पंप) नवीन विज जोडणी व मार्गदर्शन, विज समस्या रोहीत्र (धोकादायक खांब) विज बिलावरील नाव व मोबाईल नंबर बदल अशा समस्यांबाबत आयोजन करण्यात आले आहे.याचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणलाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.