नवी दिल्ली : न्यूझीलंडचा केन विल्यमसन, आॅस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ व पाकिस्तानचा बाबर आझम जास्त गुणवान असूनही भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला विनाकारण अवाजवी महत्व कशासाठी देता अशी विचारणा श्रीलंकेचा मुक्त पत्रकार डॅनिअल अलेक्झांडरने केली आहे.
19, 2, 9, 15, 51, 11, 38, 11, 45 – Virat Kohli's scores in New Zealand series 2020 (all 3 formats). #Cricket
Inns – 9
Runs – 201
Ave – 22.33
50 – 1*Steve Smith, Babar Azam & Kane Williamson top three all format batsmen and score in all conditions. Kohli over-rated.
— Daniel Alexander (@daniel86cricket) February 23, 2020
न्यूझीलंड दौ-यावर भारतीय संघाने टी-२० मालिका ५-० अशी जिंकली. त्यानंतर मात्र संघाला एकदिवसीय मालिकेत अपयश आले. कसोटी मालिकेतही पहिला सामना गमवावा लागला.
या सामन्यांत कोहलीचे अपयश ठळकपणे उठून दिसले. बाबर, स्मिथ व विल्यमसन हे कोहलीपेक्षाही जास्त सरस कामगिरी करताना दिसतात. मग कोहलीला अवाजवी महत्व का दिले जात आहे, असेही डॅनिअलने स्पष्ट केले आहे.