मुंबई – बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाने ठसा उमटवणाऱ्या मोजक्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे संजय दत्त. केजीएफच्या दुसऱ्या पार्टद्वारे अभिनेत्याने कन्नड सिनेमात देखील पदार्पण केले. या चित्रपटातील त्यांच्या कामाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान संजय दत्त बॉलीवूड विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपट या वादावर मोकळेपणाने बोलला.
बॉलिवूडचे चित्रपट भारी की साऊथचे भारी असा वाद सध्या सोशल मिडीयावर अनेकदा पाहायला मिळतो. याच विषयावर संजय दत्तला विचारले असता तो म्हणाला,सिनेमांना असं वेगळे करणे योग्य नाही. मी याला दक्षिण आणि बॉलीवूड आणि उत्तर किंवा पूर्व म्हणून पाहत नाही. या देशात बनवलेला प्रत्येक चित्रपट एका सिनेमाचा भाग आहे, जो भारतीय सिनेमा आहे. तो तसाच असला पाहिजे. आम्ही भाग आहोत. एका देशाचा, तो एक संघ आहे. सिनेमा वेगळा करणे योग्य नाही” असं स्पष्ट मत संजूबाबाने यावेळी व्यक्त केले.
हा संपूर्ण उद्योग एक मोठा परिवार आहे, जी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी चांगली गोष्ट आहे. आम्ही भारतीय चित्रपट उद्योगाचे प्रतिनिधित्व करतो आणि प्रत्येक गोष्ट त्याच्याशी संबंधित आहे. दक्षिण, पूर्व, उत्तर आणि पश्चिम असं म्हणू नका नका, हे सर्व एक कुटुंब आहे असं देखील संजय दत्त यावेळी म्हणाला. तसेच यावेळी संजय दत्तने त्याच्या सुरुवातीच्या काळाबाबत देखील भाष्य केले.
संजूच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच हेरा फेरीच्या तिसऱ्या पार्टमधे झळकणार आहे. या चित्रपटात तो रवी किशनच्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी यांची जोडी बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर प्रेक्षकांसमोर येणार आहे.