मुंबई – जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता संघ ठरवण्यासाठी एक नव्हे, तर तीन कसोटी सामने अंतिम सामने म्हणून खेळवले गेले पाहिजेत, असे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले होते.
मात्र, वेळ गेल्यावर कोणत्याही गोष्टीबद्दल मत व्यक्त करणे योग्य नाही, असे सांगत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली याने कोहलीला घरचा आहेर दिला आहे.
या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर कोहलीने आयसीसीच्या भूमिकेवर टीका करत विजेतेपद निश्चित करण्यासाठी बेस्ट ऑफ थ्री आराखडा हवा होता, असे म्हटले होते.