बीड – कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्ञानेश्वर बाबुराव महागोविंद (वय 30, राजेवाडी, ता. माजलगाव, जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या तरूण शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या वर्षी कर्जाला कंटाळून वडिल बाबुराव महागोविंद यांनी आत्महत्या केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी बाबुराव महागोविंद यांनी खासगी पतसंस्थेच्या कर्जाला कंटाळून गेल्या वर्षी आत्महत्या केली होती. दोन दिवसांपूर्वी त्यांचे वर्षश्रद्ध होते. तेव्हापासून मुलगा ज्ञानेश्वर तणावात होता. कर्जाची परतफेड झालेली नव्हती. बॅंकेच्या परतफेडीच्या तगाद्याला कंटाळून ज्ञानेश्वर यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
वीष प्राशन करून त्यांनी आत्महत्या केली. वर्षभरातच या शेतकरी कुटुंबातील दोन कर्ते पुरुष गेल्याने, कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून पपरिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी दिंद्रुड पोलिसात मृत्यूची अकस्मात नोंद करण्यात आली आहे.