कोझिकोड : “विमान क्रॅश होत असताना सर्वत्र किंकाळ्या ऐकू येत होत्या… कोणीतरी म्हणालं दोन्ही पायलट ठार झालेत… दोन स्त्रियाही मृत्युमुखी पडल्या आहेत… आम्ही सर्व समोरच्या सिट्सला घट्ट पकडून बसलो होतो… काहीही करून आम्हाला सीटवर बसून राहायचा होतं… मात्र प्लेन क्रॅश झाल्यानंतर त्याचे दोन तुकडे झाले…” हा थरार सांगितलाय एअर इंडियाच्या एक्सप्रेस IX-1344 विमान दुर्घटनेत बचावलेल्या एका प्रवाशाने.
काल दुबईहून भारताकडे निघालेल्या एअर इंडियाच्या एक्सप्रेस IX-1344 या विमानाचा भीषण अपघात झाला. जोरदार पाऊस सुरु असतानाच केरळ येथील कोझिकोड विमानतळावर हे विमान लँडिंग करत होतं. मात्र धावपट्टीवरून घसरून हे विमान ५० फूट खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत विमानाचे दोन तुकडे झाले.
विमानामध्ये कर्मचाऱ्यांसह एकूण १८२ जण प्रवास करीत होते.यातील १७ ते १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या विमान दुर्घटनेत जखमी झालेल्यांना शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
“ही दुर्घटना एखाद्या भीतीदायक स्वप्नासारखी होती. शक्य असतं तर त्यांनी हे विमान एखाद्या दुसऱ्या विमानतळावर उतरवलं असतं, मात्र परिस्थिती अशी होती की त्यांचेकडे दुसरा पर्याय नव्हता.” या दुर्घटनेतून वाचलेल्या एका प्रवाशाने ही भयकथा सांगितली आहे.
kerala plane crash । विमान दुर्घटनेनंतर पहिल्या पाच मिनीटांत नक्की काय घडलं? वाचा सविस्तर…
विमान दुर्घटनेनंतर स्थानिकांनी दाखवलेल्या माणुसकीला डॉक्टरांचाही सलाम; म्हणाले…
“…यानंतर क्षणाचाही विलंब न लावता आपला जीव वाचवण्यासाठी दरवाज्यातून उड्या मारल्या”
हे सुद्धा वाचा…
VIDEO। थरकाप उडवणाऱ्या पावसात ‘ती’ 7 तास मुंबईकरांसाठी लढत होती