पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून केलेल्या वक्तव्यामुळे राजकारणाला सुरुवात झाली आहे. राम मंदिर ट्रस्टमधील विश्वस्त असलेले आचार्य किशोरजी व्यास यांनी शरद पवार यांच्या विधानावर हल्लाबोल केला.
पत्रकार परिषदेत ते म्हणाले,’काही लोकांना मोदी आवडतच नाहीत त्यामुळं मोदीचं नाव घेताच त्यांच्या पोटात कसतरी व्हायला लागतं. त्यामुळे मोदींनी केलेल्या कामाचा विरोध असे लोक नेहमी करत असतात.
ते पुढे म्हणाले, ‘करोनासाठी स्वतः पंतप्रधान इतकं काम करीत आहेत की असं काम दुसरं कोणीही केलं नसतं. करोनाच्या काळात लोकांमध्ये प्रसन्नता वाढावी यासाठी मोदींनी अयोध्येला जाणं गरजेचं आहे. यामुळे करोनाचं संकटही कमी व्हायला सुरुवात होईल. ‘ असं म्हणत त्यांनी शरद पवार यांच्या विधानावर हल्लाबोल केला.
दरम्यान, येत्या ५ ऑगस्ट’ला पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. ट्रस्ट ने त्यांना ऑगस्ट महिन्यातील ३ आणि ५ अश्या दोन तारखा दिल्या होत्या. त्यापैकी ५ तारीख पंतप्रधान कार्यालयाने ठरवली असल्याची माहिती आहे.