मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीत बिहार मध्ये केवळ मते मिळवण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न प्रदान केला आहे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना ठाकरे यांनी दावा केला की भारतीय जनता पक्षाचा आधीचा अवतार असलेल्या भारतीय जनसंघाने सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांना 26 टक्के आरक्षण देण्याच्या कर्पुरी ठाकूर यांच्या निर्णयाला विरोध केला होता. पण आता भाजपला लोकसभा निवडणुकीत बिहारमधून मते हवी आहेत म्हणून त्यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर केला गेला आहे.
ज्यांच्या कार्याला आधी विरोध केला त्यांनाच मान देण्याची वेळ भाजपवर आली आहे. तथापि इतक्या वर्षांनंतर त्यांच्या कर्पुरी ठाकूर कार्याची दखल घेतली जात आहे, याचा मला आनंद आहे,” असेही ठाकरे म्हणाले.
भाजपने भारतरत्नसाठी डॉ. एस. स्वामीनाथन यांच्या नावाची घोषणा केली, परंतु त्यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने शेतीचे उत्पन्न वाढवण्याबाबत केलेल्या शिफारशींची अंमलबजावणीकडे मात्र मोदी सरकारने साफ दुर्लक्ष केले असे ठाकरे पुढे म्हणाले.सरकाऱच्या या घोषणांमधील पोकळपणा यातून लोेकांच्या लक्षात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.