Udhayanidhi Stalin : द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शनिवारी अहमदाबादमध्ये होणारा भारत-पाकिस्तान विश्वचषक सामन्यादरम्यान, एक पाकिस्तानी खेळाडू ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात असताना प्रेक्षकांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्यात आल्या, त्यावर उदयनिधी यांनी टीका केली आहे. तर भाजपने(bjp) यावर प्रत्युत्तर देत सडकून टीका केली आहे.
तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी (Udhayanidhi) यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘भारत आपल्या क्रीडा भावनेसाठी आणि आदरातिथ्यासाठी ओळखला जातो. शेजारील देशांतील खेळाडूंना दिलेली वागणूक कमी दर्जाची आहे. तसेच, ‘भारत हा खेळातील उत्साह आणि आदरातिथ्य यासाठी ओळखला जातो. मात्र, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाकिस्तानी खेळाडूंना ज्या प्रकारे वागणूक दिली गेली ती अस्वीकार्य आणि कमी दर्जाची आहे.” असे त्यांनी म्हटले.
India is renowned for its sportsmanship and hospitality. However, the treatment meted out to Pakistan players at Narendra Modi Stadium in Ahmedabad is unacceptable and a new low. Sports should be a unifying force between countries, fostering true brotherhood. Using it as a tool… pic.twitter.com/MJnPJsERyK
— Udhay (@Udhaystalin) October 14, 2023
उदयनिधी(Udhayanidhi) पुढे म्हणाले, ‘क्रीडा ही देशांना एकत्र आणणारी शक्ती असली पाहिजे, त्याचे कार्य बंधुभाव वाढवणे हे असले पाहिजे. द्वेष पसरवण्याचे साधन म्हणून त्याचा वापर करणे निषेधार्ह आहे.असे देखील त्यांनी म्हटले.
नफ़रती डेंगू मलेरिया मच्छर फिर निकला है विष घोलने जब मैच रुकवा कर फील्ड पर नमाज़ पड़ी जाती है तो तुम्हें साँप सूँघ जाता है
सृष्टि के हर कन कन मे हमारे प्रभु श्री राम बसते है, तो बोलो जय श्री राम 🙏#IndiavsPak pic.twitter.com/Tm7Ikxbtqw
— Gaurav Bhatia गौरव भाटिया 🇮🇳 (@gauravbhatiabjp) October 15, 2023
दरम्यान, उदयनिधी (Udhayanidhi)यांनी केलेल्या टीकेला आता भाजपनेही(bjp) प्रत्युत्तर दिले आहे.भाजपचे(bjp)राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘डेंग्यू मलेरियाचा घृणास्पद डास पुन्हा विष देण्यासाठी बाहेर आला आहे. जेव्हा सामना थांबवला जातो आणि मैदानावर नमाज अदा केली जाते तेव्हा तुम्हाला सापाचा वास येतो. आपले प्रभू श्री राम विश्वाच्या प्रत्येक कोपऱ्यात वास करत आहेत, म्हणून जय श्री राम म्हणा.” असे त्यांनी म्हटले आहे.
भारताने हा सामना सात विकेटने सहज जिंकला. विश्वचषक स्पर्धेत भारताने सलग आठव्यांदा पाकिस्तानचा पराभव केला. भारतीय क्रिकेट चाहते या सामन्याची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते आणि त्याचा परिणाम त्यांना विजयाच्या रूपाने मिळाला.