मुंबई : देशातील विविध राज्यातून केंद्र सरकाराच्या नव्या अग्निपथ योज़नेला विरोध होताना पाहायला मिळतो आहे. बिहारमध्ये तर या योज़नेच्या विरोधात केलेल्या आंदोलनाला हिणसाक वळण लागले आहे. सरकारी मालमत्तांचे देखील नुकसान झाले आहे. यायोज़नेवरून काँग्रेस, बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि लोकदल पक्षानेही या योजनेचा पुनर्रविचार करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. त्यानंतर आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देखील या योजनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
या योज़नेबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, 10 लाख नोकऱ्या द्यायची घोषणा केली. महागाई कमी करण्याची घोषणा केली. आता ही नवी अग्नीपथ योजना काढली. सैन्य पोटावर चालतं. शिस्त असते. सैन्यात ठेकेदारी पद्धतीनं भरती होणार असेल तर भारतीय सैन्याची प्रतिष्ठा रसातळाला जाईल. ठेकेदारीवर गुलाम घेतला जाऊ शकतो. सैन्य ठेकेदारीवर कसे घेतले जाऊ शकते. त्यांच्यावर देशाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. त्यांना ठेकेदारी पद्धतीवर चार वर्षांसाठी कामावर ठेवणं हा भारतीय सैन्यदलाचा अपमान आहे. राष्ट्रीय सुरक्षा दलाचा अपमान आहे, असं संजय राऊत म्हणाले.