नागपूर – ठाण्याच्या शहापूरमध्ये भातखरेदीमध्ये जवळपास दीड कोटींचा घोटाळ्याप्रकरणी विद्यमान आमदाराच्या पुतण्यासह अन्य पाच जणांविरोधात किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण सत्तेत होणाऱ्या घोटाळ्यांवर अळीमिळी गुपचिळीची भूमिकाच दाखवली जाते, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाण साधला.
जयंत पाटील म्हणाले, केंद्र सरकारच्या किमान आधारभूत योजनेअंतर्गत शहापूरच्या साकडबाव केंद्रामध्ये सुमारे 14 हजार क्विंटल भाताची खरेदी करण्यात आली. भरडईसाठी त्यातील जवळपास साडेआठ हजार क्विंटल भात नेण्यात आला. त्यानंतर मात्र उर्वरित सुमारे सव्वापाच क्विंटल भात आढळला नाही. त्याचा तपास घेतला असताना जवळपास 1 कोटी 60 लाख रुपये किमतीचा घोटाळा झाल्याचे समोर आले.
याप्रकरणी शहापूरमधील आमदार दौलत दरोडा यांचा पुतण्या आणि साकडबाव आदिवासी सेवा सोसायटीचे अध्यक्ष हरीश दरोडा यांच्यासह अन्य पाच जणांवर किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरीश दरोडा यांनी आदिवासी विकास महामंडळाचे तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे, शहापूरचे तत्कालीन उपप्रादेशिक व्यवस्थापक अविनाश राठोड यांच्या संगनमताने शेतकऱ्यांच्या खोट्या आणि बोगस चलन पावत्या बनवल्याचा आरोप आहे.
आदिवासी विकास प्रकल्पातील हजारो क्विंटल धान्य लंपास करून जो कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे, त्यावर सत्ताधारी कधी कारवाई करणार? यांच्या सत्तेत होणाऱ्या घोटाळ्यांवर अळीमिळी गुपचिळीची भूमिकाच दाखवली जाते. आदिवासी विकास प्रकल्पातील हजारो क्विंटल धान्य लंपास करून जो कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे,
त्यावर सत्ताधारी कधी कारवाई करणार? यांच्या सत्तेत होणाऱ्या घोटाळ्यांवर अळीमिळी गुपचिळीची भूमिकाच दाखवली जाते. आदिवासी समाजाच्या हक्काचे धान्य इतक्या मोठ्या प्रमाणात गायब होत आणि हे कोणाच्याच लक्षात आले नाही? ही अतिशय गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.