मुंबई – थोड्याच दिवसात पवित्र श्रावण महिना सुरु होतोय. त्यामुळे अनेकांनी भक्तिभावाने उपवास करण्याचे प्लॅनिंग देखील सुरु केले असेल. भगवान शंकराच्या श्रावणातील भक्तीवर अनेकांची श्रद्धा आणि विश्वास आहे. म्हणूनच या महिन्यात अनेकजण कडक उपवास करतात. बदलत्या हवामानानुसार उपवासादरम्यान विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जेणेकरून तुमच्या शरीराला कोणताही त्रास होणार नाही. यासाठी आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही उपवासात स्वतःला हायड्रेट ठेवू शकता.
सुका मेवा
तुम्हाला माहीत आहे का की सुका मेवा योग्य आहाराची कमतरता एका प्रकारे पूर्ण करू शकतो? त्यामध्ये असलेल्या कॅलरी आणि पोषक तत्वांमुळे शरीराला ताकद मिळते. शरीरात ऊर्जा राहते, त्यामुळे थकवा येत नाही. उपवासाच्या दरम्यान अक्रोड, बदाम आणि काजू असा सकस आहार खात राहा. ते खाल्ल्याने तुमची भूक तर भागेलच, सोबतच पोटही भरेल आणि तुमची प्रकृती बिघडणार नाही.
नारळ पाणी प्या
शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळाचे पाणी सर्वोत्तम मानले जाते. तुमची इच्छा असल्यास उपवासाच्या दिवशी तुम्ही याचे सेवन करू शकता. जर तुमच्याकडे नारळ पाणी नसेल तर त्याऐवजी तुम्ही पूर्ण वेळ आणि जास्त पाणी प्या. अशा प्रकारे तुम्हाला भूक लागणार नाही आणि शरीरात अशक्तपणा येणार नाही. एकाच वेळी जास्त पाणी पिण्याची गरज नाही हे लक्षात ठेवा. यासाठी वेळ निश्चित करा आणि मर्यादित प्रमाणातच पाणी प्या.
फळे खा
शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी फळेही प्रभावी मानली जातात. उपवासात तुम्ही दिवसभर उपाशी राहता, अशा स्थितीत तुमची प्रकृतीही बिघडू शकते. जर तुम्हाला हायड्रेटेड राहायचे असेल तर दिवसातून किमान तीनदा ताजी फळे खा. आहाराची वेळ चुकुवू नका जेणेकरून तुम्हाला त्रास होईल. मधुमेह तसेच बीपी सारखे आजार असतील तर विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.