नवी दिल्ली – टाळेबंदीच्या काळात विविध भागांत अडकून पडलेल्या सुमारे पाच लाख स्थलांतरित मजुरांना 468 विशेष रेल्वेंद्वारे त्यांच्या-त्यांच्या राज्यांमध्ये सोडण्यात आले आहे. या अंतर्गत काल (रविवार) 101 विशेष रेल्वे सोडण्यात आल्या होत्या. तसेच, वंदे भारत मशीन अंतर्गत जवळपास चार हजार भारतीयांना 23 विशेष विमानांद्वारे परत आणण्यात आले आहे.
देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाउनमध्ये वाढ करण्यात आली असून केंद्राकडून काही शिथिलता देण्यात आली आहे. केंद्राने राज्यांतर्गत मजुरांना स्वगृही जाण्याची परवानगी दिली. तसेच स्थलांतरीत मजुरांसाठी “श्रमिक’ विशेष रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या विशेष रेल्वेतून देशभरातील सुमारे पाच हजाराहून अधिक मजूरांना त्यांच्या-त्यांच्या गावी सोडण्यात आले आहे.
या विशेष रेल्वेतून तिरुचिराप्पल्ली, टिटलागड, बरौनी, खंडवा, जगन्नाथपूर, खुर्दा रोड, प्रयागराज, छपरा, बलिया, गया, पूर्णिया, वाराणसी, दरभंगा, गोरखपूर, लखनऊ, जौनपूर, हटिया, बस्ती, कटिहार, दानापूर, मुझा या शहरांमध्ये प्रवासी आणले आहेत.
दरम्यान, श्रमिक स्पेशल रेल्वेतून आजपासून 1200 ऐवजी प्रत्येकी 1700 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. यामुळे जास्तीत जास्त मजुरांना लवकरात लवकर त्यांच्या घरी पोहोचविण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे संबंधिक अधिका-यांनी सांगितले.