नवी दिल्ली : भारताला २०२२ साली होणा-या राष्ट्रकुल नेमबाजी आणि तिरंदाजी स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले आहे. या स्पर्धामधील पदकांचा समावेश त्याचवर्षी बर्मिगहॅम येथे होणा-या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत करण्यात येईल, असे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या वतीने (सीजीएफ) सांगण्यात आले आहे.
बर्मिगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत यंदापासून नेमबाजी आणि तिरंदाजी हे खेळ पर्यायी खेळ म्हणून समाविष्ट करण्यात आले आहेत. भारताने बर्मिगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचे ठरविले होते, मात्र आता याच स्पर्धेचे भारताला यजमानपद देण्यात आले आहे.
A Commonwealth Archery and Shooting Championships is set to take place in India in 2022 after a proposal to stage the event was approved by the CGF Executive Board 🇮🇳https://t.co/0uNToFltC8 pic.twitter.com/1nI6zAgwOw
— Commonwealth Sport (@thecgf) February 24, 2020
ही स्पर्धा चंदीगडमध्ये २०२२ सालच्या जानेवारीत होणार आहेत. बर्मिगहॅम राष्ट्रकुल स्पर्धा २७ जुलै ते ७ आॅगस्ट २०२२ या कालावधीत होणार आहेत.
भारताला या स्पर्धासाठी आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ आणि जागतिक तिरंदाजी महासंघाकडून पाठिंबा मिळाला आहे. १९९६ पासून प्रत्येक राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजी समाविष्ट आहे.