मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान नाकारता येणार नाही, मात्र त्यांच्याबाबत पुन्हा पुन्हा चर्चा करुन, त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करुन समाजात गैरसमज पसरवण्याचं कारण नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना खडसावलं. शिवसेना सत्तेच्या लोभापायी सावरकरांचा अपमान सहन करत आहे, अशी टीका मंगळवारी (25 फेब्रुवारी) आझाद मैदानावरच्या भाषणात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर आज सावरकरांच्या पुण्यतिथीला उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर पलटवार केला.
दरम्यान, सावरकारांची पुण्यतिथी निमित्त भाजपने विधिमंडळाच्या परिसरात सावकरांची प्रतिमा लावून त्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात आले होते. त्यामुळे राजकीय वातावरणात वेगळी चर्चा सुरू झालीय.