मुंबई – शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात निकाल कोणत्या गटाच्या बाजूने लागणार? याची सगळ्यांनाच उत्सुक्ता होती. आजच्या या निकालाकडे सगळ्या फक्त महाराष्ट्राचंच नाही तर देशांचं लक्ष लागलं होतं. अखेर हा निकाल समोर आला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचे 16 आमदार पात्र असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचंही स्पष्ट केलंय. या निर्णयानंतर आता महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचा सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरव्दारे निकालावर फक्त पाच शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, “येह तो होना ही था ……”#ठाकरे, न्याया ची अपेक्षा कोणा कडून करता … जनता न्याय करेल.
येह तो होना ही था ……#ठाकरे
न्याया ची अपेक्षा कोणा कडून करता …
जनता न्याय करेल— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 10, 2024
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या आमदारांवर निकाल दिला आहे त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महेश शिंदे, अब्दुल सत्तार, भरत गोगावले, संजय शिरसाट, यामिनी जाधव, अनिल बाबर, तानाजी सावंत, लता सोनवणे, प्रकाश सार्वे, बालाजी किणीकर, संदिपान भुमरे, बालाजी कल्याणकर, रमेश बोनारे, चिमणराव पाटील, संजय रायमुलकर यांचा समावेश आहे.