महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नांदेडचा शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यात थरार रंगला. या सामन्यात शिवराज राक्षे वरचढ ठरला आणि त्याने ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकावला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्याच्या थराराच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमस्थळी दाखल झाले होते. माती विभागातील महेंद्र गायकवाडने तर मॅट विभागातुन शिवराज राक्षेने अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. त्यामुळे दोन्ही मल्लांमध्ये अतिशय चुरशीची लढत अख्या महाराष्ट्राला पाहायला मिळाली.
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या या कुस्तीच्या महत्वाच्या सामन्यात नांदेडच्या शिवराजने आपला पराक्रम दाखवला आणि हा मानाचा किताब पटकावला आहे. ६५ वा महाराष्ट्र केसरी बनण्याचा मान त्याने मिळवला आहे. तर पुण्याचा महेंद्र गायकवाड या स्पर्धेचा उपविजेता ठरला आहे.
आजपर्यंत झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा आणि विजेते
१९६१- औरंगाबाद- दिनकर दह्यारी
१९६२- धुळे- भगवान मोरे
१९६३- सातारा- स्पर्धा रद्द
१९६४- अमरावती- गणपत खेडकर
१९६५- नाशिक- गणपत खेडकर
१९६६- जळगाव- दिनानाथ सिंह
१९६७- खामगाव, बुलढाणा- चंबा मुतनाळ
१९६८- अहमदनगर- चंबा मुतनाळ
१९६९- लातूर- हरिश्चंद्र बिराजदार
१९७०- पुणे- दादू चौगुले
१९७१- अलिबाग, रायगड- दादू चौगुले
१९७२- कोल्हापूर- लक्ष्मण वडार
१९७३- अकोला- लक्ष्मण वडार
१९७४- ठाणे- युवराज पाटील
१९७५- चंद्रपूर- रघुनाथ पवार
१९७६- अकलूज, सोलापूर- हिरामण बनकर
१९७७- चाळीसगाव, जळगाव- अनिर्णित
१९७८- मुंबई- आप्पासाहेब कदम
१९७९- नाशिक- शिवाजीराव पाचपुते
१९८०- खोपोली, रायगड- इस्माईल शेख
१९८१- नागपुर- बापू लोखंडे
१९८२- बीड- संभाजी पाटील
१९८३- पुणे- सरदार खुशहाल
१९८४- सांगली- नामदेव मोळे
१९८५- पिंपरी चिंचवड, पुणे- विष्णु जोशीलकर
१९८६- सोलापूर- गुलाब बर्डे
१९८७- नागपुर- तानाजी बनकर
१९८८- अहमदनगर- रावसाहेब मगर
१९८९- वर्धा- अनिर्णित
१९९०- कोल्हापूर- अनिर्णित
१९९१- अमरावती- अनिर्णित
१९९२- पुणे- आप्पालाल शेख
१९९३- बालेवाडी, पुणे- उदयराज जाधव
१९९४- अकोला- संजय पाटील
१९९५- नाशिक- शिवाजी केकान
१९९६- स्पर्धा रद्द
१९९७- देवळी, वर्धा- अशोक शिर्के
१९९८- नागपुर- गोरखनाथ सरक
१९९९- पुणे- धनाजी फडतरे
२०००- खामगाव, बुलढाणा- विनोद चौगुले
२००१- नांदेड- राहुल काळभोर
२००२- जालना- मुन्नालाल शेख
२००३- यवतमाळ- दत्तात्रय गायकवाड
२००४- वाशी- चंद्रहास निमगिरे
२००५- इंदापूर, पुणे- सईद चाउस
२००६- बारामती, पुणे- अमोल बुचडे
२००७- औरंगाबाद- चंद्रहार पाटील
२००८- सांगली- चंद्रहार पाटील
२००९- सांगवी, पुणे- विकी बनकर
२०१०- रोहा, रायगड- समाधान घोडके
२०११- अकलूज, सोलापूर- नरसिंग यादव
२०१२- गोंदिया- नरसिंग यादव
२०१३- भोसरी- नरसिंग यादव
२०१४- अहमदनगर- विजय चौधरी
२०१५- नागपुर- विजय चौधरी
२०१६- वारजे, पुणे- विजय चौधरी
२०१७-भुगाव, पुणे- अभिजीत कटके
२०१८- जालना- बाला रफिक शेख
२०१९- बालेवाडी, पुणे- हर्षवर्धन सदगीर
२०२२- सातारा- पृथ्वीराज पाटील
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पुण्यासह अख्या देशाला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा पाहायवयास मिळाला. २०२३ चा हा मानाचा किताब नांदेडच्या शिवराज राक्षेने जिंकला.