नवी दिल्ली – मतदानकार्डला आधारकार्ड लिंक मंजूर करण्याचा प्रस्ताव काल लोकसभेत मंजूर झाला आहे. मात्र मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करण्यास शिवसेनेने विरोध केला आहे. याला शिवसेनेचा विरोध असेल असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
निवडणूक प्रक्रियेत मतदानकार्डाला आधारकार्ड लिंक करायला नको. यामागे केंद्र सरकारचा कुठला तरी कुटील डाव असू शकतो, असा गंभीर आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. तसेच काल राज्यसभेत जया बच्चन यांनी संताप व्यक्त केला. त्यांचा संताप, उद्रेक स्वाभाविक आहे, असेही राऊत यांनी सांगितले.
भाजपेत्तर राज्यात केंद्राकडून विरोधकांना त्रास दिला जातो आहे, या त्यांच्या पक्षाच्या भूमिकेचा त्यांनी पुनरूच्चार केल. तसेच सिंधुदुर्गात चारही नगरपरिषदेत युती यशस्वी होणार असल्याचा दावा त्यांनी केला. शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. रामदास कदम आणि अनिल परब यांच्यातील गटबाजीत उद्धव ठाकरे लक्ष घालतील असे ते म्हणाले.