नवी दिल्ली – सरकार स्थापनेसाठी आपल्याला तीन दिवसांचा अपेक्षित वेळ न देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाच्या विरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आम्हाला राज्यपालांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने या याचिकेवर आजच सुनावणी घेतली जावी अशी विनंतीही शिवसेनेच्या वकिलांनी न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडे केली होती.
आम्हाला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची संधी दिली गेली नाही, राज्यपालांनी आम्हाला ती द्यायला हवी होती असेही शिवसेनेचे म्हणणे आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बाबतीत सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी घेतलेला निर्णय रद्दबातल ठरवावा अशी मागणीही शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे.
शिवसेनेला सरकार स्थापन करण्या इतके संख्याबळ असताना ते सिद्ध करण्याची पुरेशी संधी त्यांनी देणे अपेक्षित होते. पण त्यांनी ती संधी नाकारून घटनेच्या कलम 14 आणि 21 चा भंग केला आहे असा शिवसेनेचा दावा आहे. यात शिवसेनेने गृहमंत्रालय, महाराष्ट्र सरकार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनाही वादी केले आहे.