म्हाळुंगे – राष्ट्रवादीकडून आले, राष्ट्रवादीचे ते पार्सल आहे. माझ्यासाठी फारच टीकाकार आहेत. महाविकास आघाडीला भाजपवाले तीन चाकी रिक्षा म्हणायचे आता मला सांगा तुमची किती जणांची रिक्षा आहे? मुख्यमंत्री घरी नाही अन् मंत्रालयातही ते गरबा, मंदिर, नवस फेडायला जातात, त्यांना मुख्यमंत्रीपद मिळणं वेगळं, पण पॉवर मिळाली पाहिजे. फक्त माझ्याबद्दल उलट सुलट बोलायचे आणि तोंडसुख घ्यायचे असा कार्यक्रम सध्या सुरू आहे, अशा शब्दांत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली.
भुगाव येथे शिवसेना उपतालुकाप्रमुख आणि नवनिर्वाचित उपसरपंच कालिदास शेडगे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अंधारे बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, आपला देश भयंकर परिस्थितीत आहे, त्यामुळे देश घडवणे सध्या खूप गरजेचे आहे. गरज नसलेले मुद्दे पुढे आणले जात आहेत. सर्वसामान्य लोकांच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होऊन समाजाला काल्पनिक जगाकडे नेले जात आहे, त्यामुळे आपली पिढी कल्पनेच्या जगात वावरते आहे,
यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख आमदार सचिन आहिर, उपनेते प्रा. नितीन बानगुडे पाटील, जिल्हा प्रमुख, माजी सभापती बाळासाहेब चांदेरे, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, कुलदीप कोंडे, जि.प. माजी उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, जिल्हा सहसंघटिका स्वाती ढमाले, जिल्हा सहसंघटिका संगीता पवळे, शहर प्रमुख गजानन थरकुडे, युवासेना अधिकारी अविनाश बलकवडे, तालुका प्रमुख सचिन खैरे, भूगाव सरपंच विनीता तांगडे, प्रकाश भेगडे, संतोष मोहोळ आदी उपस्थित होते.