Accidnet News – जिल्ह्यातील अजिंठा घाटात एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या बसमधून 66 प्रवासी प्रवास करत होते.
या अपघातात 7 ते 8 जण जखमी झाले आहेत. पुणे ते रावेर प्रवास या मार्गावरुन ही बस धावत होती. मात्र, अजिंठा घाटात येताच, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी होऊन अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांनी व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मतदकार्य सुरू केले. अपघातामधील जखमी प्रवाशांना उपचारासाठी अजिंठा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर, काही जणांना खासगी रुग्णालयाही उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
लालपरीची दुरावस्ता :
राज्यातील महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसची दूरवस्था झाल्यावरुन नेहमीच टीका करण्यात येत असते. बसमधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो, कधी बसचे सीटच हलत असते, तर खिडकीच्या काचा थडथड वाजत असतात, तर कधी पावसाळ्यात पत्र्यातून पाणीच बसमध्ये शिरते.
मात्र, कधी कधी याच बसच्या दयनीस अवस्थेमुळे वाहक-चालकही खासगीत संताप व्यक्त करतात. त्यामुळे, काहीवेळा ह्या बस अपघाताचे कारणही ठरतात.
तर, गेल्या काही दिवसांत अपघातांच्या घटनातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मंडळ आता नफ्यात आल्याच्या वल्गना करणाऱ्या सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.