नवी दिल्ली – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता मिळावी, अशी मागणी करणारी याचिका त्या गटाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहे. त्या याचिकेला शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या याचिकेवर कार्यवाही सुरू करून दोन्ही गटांना कागदपत्रे सादर करण्याची सुचना केली आहे. या प्रक्रियेलाच याद्वारे आव्हान दिले गेले आहे. शिंदे गटाने पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हावर पण दावा दाखल केला आहे.
निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, दोन्ही बाजूंना 8 ऑगस्टपर्यंत कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे, ज्यात पक्षाच्या विधिमंडळ आणि संघटनात्मक शाखांकडून पाठिंब्याची पत्रे आणि प्रतिस्पर्धी गटांच्या लेखी निवेदनांचा समावेश करण्यास सांगण्यात आले आहे.
अर्जुन खोतकर आणि एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट; राजकीय चर्चांना उधाण
शिवसेनेचे सरचिटणीस सुभाष देसाई यांनी ही नवीन याचिका दाखल केली आहे. त्यांनी निवडणूक आयोगालाही पक्षकार बनवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी मागितली आहे. महाराष्ट्रात शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यात आल्याच्या घटनेला सर्वोच्च न्यायालयात या आधीच आव्हान देण्यात आले असून त्यावरील निर्णय अद्याप प्रलंबीत असल्याने निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या याचिकेवर कोणतीही पुढील कारवाई करू नये, अशी मागणी ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
शिवसेना, नाते जिव्हाळ्याचे..छोट्या शिवसैनिकाचा Video Viral