केंदूर (शिरूर) : केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे, कांद्यांच्या किमतीत वाढ होत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. यासंदर्भात डिजीटल प्रभातने केंदूर (ता. शिरूर) येथील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1329254647414237/
दरम्यान, याआधी कोरोनामुळे बाजारपेठा बंद असल्याने कांदाचाळ खराब झाल्या. यातून सावरत असतानाच त्यानंतर अतिवृष्टीमुळे रोपवाटिका देखील नष्ट झाल्या. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सरकारने निर्यातबंदीचा निर्णय मागे घ्यावा अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. अन्यथा शेतकरी संघटनेने आंदोलनांचा इशारा दिला आहे.