मुंबई – एकेक करीत राज्यातील सर्व महत्वाचे प्रकल्प राज्याच्या बाहेर चालले आहेत. यातील एकही प्रकल्प थांबवण्यात शिंदे-फडणवीस सरकारला यश येत आलेले नाही. हे सरकार केवळ पोकळ घोषणाबाजी करण्याशिवाय काहीही करीत नाही अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.
उर्जा उपकरण निर्मीती झोन मिळवण्यासाठी महाराष्ट्र प्रयत्नशील असताना हा प्रकल्पही मध्यप्रदेशच्या वाट्याला गेला असल्याची बाब समोर आल्याने राज्यातील सरकारवर पुन्हा टीकेची झोड सुरू झाली आहे.
राज्यांतील सर्व महत्वाचे प्रकल्प राज्याबाहेर कसे गेले आणि ते परत आणण्यास राज्य सरकारने काय प्रयत्न केला असा प्रश्न राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याने उपस्थित केला. उर्जा उपकरण प्रकल्प राज्याबाहेर का गेला याचा खुलासा राज्य सरकारने केला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.