Jitendra Avhad allegations : राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी वर्तकनगर पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. आज न्यायालयासमोर हजार करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर आव्हाडांच्या वकिलांनी केलेल्या जमीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला. जामिनावर बाहेर आल्यानंतर आमदार आव्हाड यांनी गंभीर आरोप केले आहेत. “तक्रारदार मिळत नव्हता, त्यामुळे त्यांनी विवियाना मॉलचे व्यवस्थापक आणि सिनेपोलीसच्या कर्मचाऱ्यांवर जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप | Jitendra Avhad allegations
– आपल्याला कलम ४१ (अ) अन्वये नोटीस देण्यात आली.
– ही नोटीस आपल्याला दुपारी दोन वाजता देण्यात आली.
– नोटिसीमध्ये ५ वाजता चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहा, असं सांगण्यात आलेलं मात्र अडीच वाजताच अटक करण्यात आली.
– नोटीस दिल्यानंतर ७२ तासांच्या आत कुणालाही अटक करता येत नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा नियम आहे.
– आपल्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा हा नियम पाळला नाही.
– केवळ आपल्याला जारी केलेल्या नोटीशीवर ‘क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट- १९३२’ च्या सेक्शन ७ नुसार गुन्हा
– आपल्याला एखादा दिवस तुरुंगात ठेवायचं असेल तर कोणतं कलम लावावं? असा विचार करून हे कलम टाकण्यात आलं
– तक्रारदार मिळत नसल्याने विवियाना मॉलचे व्यवस्थापक आणि सिनेपोलीसच्या कर्मचाऱ्यांवर जोर जबरदस्ती
यावेळी बोलताना आव्हाड यांनी, आपल्याला अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप केला. | Jitendra Avhad allegations
ते म्हणाले, “वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी विनयकुमार राठोड यांचा माझ्या अटकेशी शून्य संबंध आहे. त्यांची हतबलत दर मिनिटाला समजत होती. त्यांच्या डोळ्यात फक्त अश्रू येणं बाकी होतं. सगळे पोलीस अधिकारी हतबल झाले होते. कारण असं अचानक कुणी कुणाला ताब्यात घेत नाही.”