मुंबई – सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. सत्याचा विजय झाला. सरकारला घटनाबाह्य, बेकायदेशीर म्हणणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने चपराक बसली आहे. हे जनतेचे सरकार आहे यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले आहे. कायदेशीर बाबी आणि तांत्रिक बाबी देवेंद्रजींनी सांगितल्या आहेत. देशात संविधान आहे. त्याच्या बाहेर कोणालाही जाता येणार नाही. सरकार कायदेशीर बाबींची पूर्तता करून सरकार स्थापन केले. शिंदे यांनी सांगितले.
यावर आज सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंनी तातडीची पत्रकार परिषद घेतली यावेळी अनिल परब यांनी शिंदे – फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेला अर्धवट पत्रकार परिषद म्हणत तिला केली तसेच ते म्हणाले ठाकरे गटाचा व्हीपच वैध असेल, असेही न्यायालयाने नमूद केल्यामुळे हा शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचे व्हीप सुनील प्रभू यांच्या आदेशांसंदर्भात आमदारांच्या वर्तनावर पात्र-अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांना घ्यावा लागणार आहे. असेही ते म्हणाले आहे.