Sharad Pawar – राजकारणात वेगवेगळ्या विचारधारा असतात, वेगवेगळे विचार असतात. पण देशासाठी ज्यांनी योगदान दिले त्यांचे योगदान विसरता येणार नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र ज्या प्रकारे राज्यसभेत नेहरूंवर टीका केली ती देशाच्या दृष्टीने अतिशय चुकीची आहे.
ती वेदना देणारी आहे. कारण, विशेष करून पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे असतात ते एका पार्टीचे पंतप्रधान नसतात, असे म्हणत शरद पवार यांनी नरेंद्र मोदीं यांच्यावर हल्लाबोल केला.
शरद पवार यांनी दिल्लीत विविध विद्यापीठातील युवकांशी संवाद साधला. यावेळी युवकांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.
लोकशाहीत आपल्या अधिकार मजबूत ठेवण्याचा अधिकार आहे. जेव्हा चूकीचे काही होत असेल तर त्याला चूक म्हटलेच पाहिजे. चुकीचे काम करणाऱ्यांविरोधात लढले पाहिजे, असे पवार म्हणाले.
नेहरूंचे योगदान नाकरता येणार नाही….
देशाच्या विकासासाठी देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरू यांनी योगदान दिले. त्यांचे योगदान तुम्हाला विसरता कामा नये, तंत्रज्ञान, शेती सह देशाला सर्वच क्षेत्रात पुढे आणण्याचे काम पंडीत नेहरू यांनी केले.
ज्यांनी देशासाठी योगदान दिले. अशा लोकांविरोधात सद्याच्या पंतप्रधानांनी आगपागड काढणे हे चुकीचे आहे. हे वेदनादायी आहे, असे म्हणत त्यांनी मोदींविरोधात नाराजी व्यक्त केली.