नवी दिल्ली, दि.6 –उत्तर आणि मध्य रेल्वेने पुढील आदेशापर्यंत अनेक रेल्वेगाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. करोनाबाधितांची वाढती संख्या आणि प्रवाशांची कमी वर्दळ ही कारणे त्यासाठी देण्यात आली आहेत. काही दिवस न धावणाऱ्या रेल्वेमध्ये 8 शताब्दी एक्स्प्रेस, 2 राजधानी एक्स्प्रेस, 2 दुरंतो एक्स्प्रेस आणि एका वंदेभारत एक्स्प्रेसचा समावेश आहे.
प्रामुख्याने दिल्लीहून धावणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेस आणि जम्मू-तावी, पुण्याला जाणाऱ्या दुरंतो एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, नागपूर-कोल्हापूर स्पेशल, सीएसएमटी-कोल्हापूर स्पेशल आणि सीएसएमटी-पुणे स्पेशल या रेल्वे धावणार नाहीत. करोना संकट तीव्र बनल्याने रेल्वे प्रवास करणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे अनेक रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.