नवी दिल्ली – ज्येष्ठ पत्रकार विनोद दुवा यांचं आज निधन झालं. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होती. त्यांच्या निधनाचं माहिती मुलगी मल्लिका दुवा यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच दुवा यांच्या निधनाची अफवा पसरली होती. त्यावेळी त्यांच्या मुलीने त्या अफवेचं खंडण केलं होतं.
मल्लिका दुवा यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं की, आमचे आमचे निडर आणि असाधारण वडील विनोद दुआ यांचे निधन झालं.आता ते आमच्या आईसोबत म्हणजेच स्वर्गात पत्नीसोबत आहे.
विनोद दुवा यांनी १९७४ मध्ये दूरदर्शनवर बातम्या द्यायला सुरुवात केली होती. त्यानंतर ते एनडीटीव्ही, झी न्यूज आणि सहारा या वृत्तवाहिन्यांसोबत काम करायचे. पुढे त्यांनी स्वतःची प्रॉडक्शन कंपनी काढली आणि विविध वृत्तवाहिन्यांसाठी ते कार्यक्रम सादर करू लागले. स्वतंत्र बाण्यामुळे त्यांनी कोणत्याही वृत्तवाहिनीत नोकरी करण्याचं टाळलं.
वर्तमानपत्रातील लिखित भाषा टिव्हीच्या कामाची नाही. तिथे बोली भाषा हवी असा आग्रह त्यांनी धरला. वर्तमानपत्रातील संस्कृतप्रचुर हिंदी भाषा त्यांनी टेलिव्हीजन माध्यमासाठी कधीही वापरली नाही. दूरदर्शनवर या प्रमाण हिंदी भाषेला मान्यता होती. विनोद दुवा यांनी भारतीय भाषेचा पुरस्कार केला.
विनोद दुवा यांनी दिल्लीत पत्रकारिता सुरु केली. विनोद दुवा निर्वासित छावणीत वाढलेले होते. त्यांची भाषा आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेले संबंध यामुळे त्यांची पत्रकारिता प्रभावी ठरली.
पत्रकार कधीही कार्यक्रमाचा विषय नसतो, त्यामुळे त्याने मुलाखत घेण्याचं, बातम्या सांगण्याचं वा प्रश्न विचारायचं काम करायचं असतं. आरडाओरडा करायचा नसतो, किंचाळायचं नसतं असे मापदंड त्यांनी स्थापित केले.
Senior journalist Vinod Dua passes away, confirms his daughter and actress Mallika Dua. His cremation will take place tomorrow, she posts.
(Pic Source: Vinod Dua Twitter account) pic.twitter.com/CmkSgOrWfP
— ANI (@ANI) December 4, 2021
विनोद दुवा यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानातील खैबर-पख्तुन्वा प्रांतातला. त्यामुळे ते स्वतःला पंजाबी म्हणवत नसत. कारण आम्ही सिंधू नदीच्या पश्चिम किनार्यावरचे असं ते सांगत. बोफोर्स प्रकरणात त्यांनी घेतलेल्या विविध मंत्र्यांच्या मुलाखती बहारदार होत्या. ते अतिशय शांत आणि सहजपणे अडचणीत आणणारे प्रश्न विचारत. मंत्री वा सनदी अधिकारी यांच्या सत्तेने ते दिपून जात नसत. वा त्यांच्याशी त्यांचं शत्रुत्वही नसे. रामनाथ गोएंका पुरस्कार, पद्मश्री असे अनेक पुरस्कार त्यांना पत्रकारितेबद्दल मिळाले.