नवी दिल्ली : 2019-20 या वर्षासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने महत्वाच्या पीकांच्या उत्पादनाचा दुसरा अंदाज प्रकाशित केला आहे. या वर्षात अनेक पीकांचे उत्पादन सर्वसाधारण पातळीपेक्षा जास्त राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दुसऱ्या अंदाजानुसार देशात 291.95 दशलक्ष टन विक्रमी अन्नधान्य उत्पादन होईल असे अनुमान वर्तवण्यात आले आहे. 2018-19 या वर्षातल्या 285.21 दशलक्ष टन या अन्नधान्य उत्पादनापेक्षा हे उत्पादन 6.74 दशलक्ष टन अधिक राहील.
अन्नधान्य-291.95 दशलक्ष टन (विक्रमी)
तांदूळ- 117.47 दशलक्ष टन (विक्रमी)
गहू- 106.21 दशलक्ष टन (विक्रमी)
मका- 28.08 दशलक्ष टन
डाळी-3.69 दशलक्ष टन
तेलबिया-34.19 दशलक्ष टन
सोयाबीन-13.63 दशलक्ष टन
भुईमूग- 8.24 दशलक्ष टन
कापूस- 34.89 दशलक्ष गासडी (प्रत्येकी 170 किलो)