पुणे – आठवडाभरापासून राज्यात राज्यात पावसाने थैमान घातले आहे. नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी व्यक्ती, गुरे वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच पुढील 48 तास राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यासह चार जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तर काही ठिकाणी परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार आहे.
खबरदारी म्हणून पुणे, पिंपरी चिंचवड, रायगड, नांदेड आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. अतिमुसळधार पाऊस पडलेल्या ठिकाणी शाळा बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.