मुंबई – राज्यात करोनाचे रुग्ण वाढण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून करोना काळातील नियम कडक करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रत्येकाला मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. या मास्कवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना नाव घेता टोला लगावला आहे.
काही नेते म्हणतात मी मास्क लावतच नाही, पण बाकीच्यांना करोना झाला तर काय करायचं ? असा प्रश्न उपस्थित करत अजित पवारांनी राज ठाकरे यांना नाव न घेता टोला लागावला. विधान परिषदेचे अर्थसंल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. यावेळी अजित पवार बोलत होते. ते म्हणाले की, करोनाविषयीचे नियम पाळणं आवश्यक आहे. पण काही नेते मास्क लावतच नाहीत. पण अस न करता मास्क लावा आणि काळजी घ्या, असा सल्ला अजित पवार यांना दिला.
नुकत्याच झालेल्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राज ठाकरे यांनी तोंडाला मास्क लावलं नव्हत. साहजिकच कॅमेरे राज ठाकरे यांच्यावर खिळले. पत्रकारांनी राज ठाकरे यांना तुम्ही मास्क लावलेला नाही, असं छेडलं असता, ‘मी मास्क लावतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असं उत्तर राज ठाकरे यांनी दिलं होतं.