शेतीमध्ये यांत्रिकीकरण झपाट्याने पसरत आहे, परंतु भारतातील काही शेतकरी असे आहेत ज्यांना यंत्रे महाग असल्याने खरेदी करता येत नाहीत किंवा वापरता येत नाहीत.मात्र असेही काही शेतकरी आहेत जे कमी शिकलेले आहेत मात्र शेतीच्या कामासाठी ते नवीन प्रयोग करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी एक खास मशीन बनवली आहे. भात पिकासाठी या मशीनचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होणार आहे. हे यंत्र देशी थ्रेशर आहे, जे तांदूळ न तोडता भुसापासून वेगळे करते. यामुळे शेतकऱ्यांचा पैसा,श्रम आणि वेळही वाचणार आहे.
आसाममधील मोरियाबारी येथील रहिवासी मोहम्मद फजलुल हक यांनी हे मशीन बनवले आहे, जे मेकॅनिक आहे. त्यांनी एक भात मळणी यंत्र विकसित केले आहे, त्यांनी असे यंत्र बनवले आहे जे भात शिताचे तुकडे न करता संपूर्ण भुसा भाताच्या दाण्यापासून वेगळे करते. या मळणी यंत्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते फक्त कोरड्या धान्यापासून भुसा वेगळेच करत नाही तर ओल्या धान्यापासून देखील भुसा तितकाच चांगला वेगळा करते.
चारा म्हणून भुसाचा वापर
फजलुलच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मशीनच्या वापराने धान्याची भुसकट वेगळी केली जाते. त्यामुळे भुसाचे पोषण अबाधित राहिल्याने या भुसाचा उपयोग जनावरांचा चारा म्हणूनही केला जातो किंवा शेतकरी त्याची विक्रीही करतात. त्यांनी सांगितले की हे यंत्र इलेक्ट्रिक मोटार किंवा ट्रॅक्टरला जोडून सहज चालवता येते. हे यंत्र ताशी तीनशे किलो धान्य स्वच्छ करू शकते.
मशीनची किंमत 35 हजार रुपये
हे उपकरण या भागातील पहिले देशी बनावटीचे थ्रेशर मशीन आहे. या भागातील धान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही खास गोष्ट एखाद्या गिफ्ट पेक्षा कमी नाही. फजलुल म्हणाले की, त्यांनी आतापर्यंत सुमारे ७५ थ्रेशर मशीन बनवून विकल्या आहेत. 35 हजार रुपये किंमत असल्याने शेतकऱ्यांमध्ये या यंत्राला मोठी मागणी आहे.