नवी दिल्ली – कर्णधार जयदेव उनादकटच्या दहा विकेटच्या जोरावर सौराष्ट्राने रणजी करंडक स्पर्धेत दुसऱ्या उपांत्यफेरीत गुजरात संघाचा 92 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. या विजयासह सौराष्ट्र चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहचला आहे. अंतिम फेरीत त्यांच्यासमोर दोन वेळच्या विजेत्या बंगाल संघाचे आव्हान असणार आहे.
राजकोट येथे झालेल्या सामन्यात सौराष्ट्रने पहिल्या डावात 304 धावा केल्या होत्या व गुजरातचा पहिला डाव 252 धावांवर रोखला होता. सौराष्ट्रने आपल्या दुसऱ्या डावात 274 धावा केल्या व गुजरातसमोर विजयासाठी 327 धावा करण्याचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात गुजरात संघाचा दुसरा डाव 234 धावांवर संपला व सौराष्ट्रने 92 धावांनी विजय नोदंविला.
Saurashtra hold their nerve in a thriller against Gujarat and reach the @paytm #RanjiTrophy 2019-20 final.?
Scorecard ? https://t.co/bL3yaUUHOc#GUJvSAU @saucricket pic.twitter.com/Y46g6VeqBb
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 4, 2020
सौराष्ट्राचा कर्णधार व गोलंदाज जयदेव उनादकट हा सामन्याचा शिल्पकार ठरला. त्याने पहिल्या डावात 3 तर दुसऱ्या डावात 7 गडी बाद केले. दुसऱ्या डावात गुजरातकडून कर्णधार पार्थिव पटेल याने 93 आणि चिराग गांधी याने 96 धावांची खेळी केली पण संघास विजय मिळवून देण्यास ते अपयशी ठरले.