नवी दिल्ली –सर्वोच्च न्यायालयाकडून दिल्लीचे माजी मंत्री आणि आपचे नेते सत्येंद्र जैन यांना कुठला दिलासा मिळू शकला नाही. त्यामुळे जैन यांची सोमवारी तिहार तुरूंगात वापसी झाली. ईडीने मनी लॉण्डरिंग प्रकरणी त्यांना ३० मे २०२२ ला अटक केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने २६ मे २०२३ ला त्यांना वैद्यकीय कारणांस्तव अंतरिम जामीन मंजूर केला.
त्या जामिनाची मुदत वेळोवेळी वाढवण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर, जैन यांनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला. तसेच, त्यांना आत्मसमर्पण करण्याचा आदेश दिला. त्या आदेशानंतर जैन यांनी आत्मसमर्पण केले. त्यामुळे ९ महिन्यांनी त्यांची पुन्हा तुरूंगात रवानगी झाली.