सोरतापवाडी -सोरतापवाडी परिसरातील शेतकरीवर्गात फुलांना समाधानकारक बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी सुखावला आहे. परंतु हवामानाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट येत आहे. त्यामुळे सोरतापवाडी परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
हवेली तालुक्यात गेल्या वीस वर्षांपासून फुलशेती करण्यात येत आहे. अनेक संकटे आली तरीपण येथील फुलशेती टिकून आहे. झेंडू 20 ते 30, गुलाब गड्डी 25 ते 30, गुलछडी 30 ते 40, लिली 12 ते 15, बिजली 40 ते 50 असा बाजारभाव मिळत आहे. फुलशेतीने या भागातील शेतकऱ्यांची आर्थिक घडी बसवली आहे.
बाजारभाव समाधानकारक असला तरी हवामानामुळे शेतीमाल मात्र तेवढा निघत नाही. एक एकरात बिजलीचे उत्पादनात दररोज शंभर किलो निघते. पण आता आठ दिवसांत सुध्दा तेवढे निघत नाही. लिली व गुलाबाची हीच अवस्था आहे. झेंडू व गुलछडी मात्र, या हवामानात चांगले उत्पादन देत आहेत.