शिराळा – मानसिंगभाऊ लोककल्याण अभियानातून वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अखंडपणे प्रयत्न सुरू असून आत्तापर्यंत अनेकांना त्याचा लाभ मिळवून दिला आहे, असे प्रतिपादन विराज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष विराज नाईक यांनी केले.
सागाव, ता. शिराळा येथे मानसिंगभाऊ लोककल्याण अभियान मार्फत संजय गांधी निराधार, श्रावणबाळ व इतर तत्सम वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्याविषयी त्यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा झाला. त्याच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ‘विश्वास’चे माजी संचालक मानसिंग पाटील व संचालक बाबासो पाटील यांची प्रमुख उपस्थितीती होती.
अध्यक्ष नाईक म्हणाले, शासनाकडून वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. पण, गरजू लोकांना तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारून कागदपत्रांची पूर्ततेसाठी माहितीची, वेळेची तर कधी पैशांची नड असते. यातून बहुतांशी गरजू, गोरगरीब जनतेचा वेळ वाया जाऊन, वेळेत कामे पूर्ण न झाल्याने लाभापासून वंचित रहावे लागत होते.
म्हणून गेल्या दोन तीन वर्षांपासून लोकप्रतिनिधी मानसिंगराव नाईक यांच्या नावे मानसिंगभाऊ लोककल्याण अभियान शिराळा विधानसभा मतदार संघातील गावागावात राबविले जात आहे. प्रास्तविक उदय पाटील, संग्राम पवार यांनी मनोगत कार्यक्रमास मान्यवर, ग्रामस्थ उपस्थितीत होते.