सातारा – पावसाळ्यात अत्यल्प पर्जन्यमान असल्याने 11 नोव्हे. 2023 च्या शासन निर्णयानुसार, 75 टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमानाच्या मंडलांमध्ये सातारा जिल्ह्यातील 65 मंडलांचा समावेश आहे. त्यात आणखी 12 मंडलांच्या समावेशाचा प्रस्ताव तयार केला आहे.
या मंडलांमध्ये दुष्काळ घोषित झाल्यावरर त्या अनुषंगाने सवलती, कर्जवसुलीस स्थगिती, शालेय विद्यार्थ्यांची परीक्षा फीमाफी, रोजगार कामांमध्ये शिथिलता, पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरवणे या सवलतींचे नियोजन असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. दुष्काळी स्थितीच्या उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला.
डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.